Home राष्ट्रीय शिक्षा नीति उत्तम शिक्षक होण्यासाठी स्वतःची विद्यार्थी प्रवृत्ती जागृत ठेवणे गरजेचे – श्रीधर गाडगे

उत्तम शिक्षक होण्यासाठी स्वतःची विद्यार्थी प्रवृत्ती जागृत ठेवणे गरजेचे – श्रीधर गाडगे

95
0

विद्या भारतीचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ

उत्तम शिक्षक होण्यासाठी स्वतःची विद्यार्थी प्रवृत्ती जागृत ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुर महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी केले. विद्या भारती तर्फे महाराष्ट्र राज्यस्तरीय “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अध्यापनशास्त्रातील बदल” या विषयावर तीन दिवसीय कार्यकर्ता अभ्यास वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. भारत स्वतंत्र झाला पण मेकालेप्रणित थोपवलेल्या शिक्षण पद्धतीपासून आपण ७५ वर्षे होऊनही स्वतंत्र होऊ शकलो नाही. त्यासाठी या नव्या शैक्षणिक धोरणाची गरज पडली. पण नुसते धोरण बदलून चालणार नाही तर शिक्षकांच्या माध्यमातून समाजाची मानसिकता तदनुरूप व्हावी या हेतूने हे नवे धोरण क्रियान्वित होणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षक हा अभ्यासू असावा. हा संधीकाळ असल्याने शिक्षणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या आधारावर समाजरचना उभी व्हावी असा प्रयत्न सर्वांनी मिळून करावा व अशी मानसिकता ठेवून कार्य करावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. स्थानिक राधाकृष्ण मंदीर, वर्धमान नगरात आयोजित वर्गात व्यासपीठावर विदर्भ प्रांताच्या उपाध्यक्षा सौ. प्रांजलीताई जोशी आणि विद्या भारती विदर्भ व देवगिरी प्रांत संघटनमंत्री शैलेश जोशी होते.

अभ्यास वर्गाची भूमिका मांडताना शैलेश जोशी म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या क्रियान्वयनासंदर्भात राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण वर्गाच्या अनुभवातून या वर्गाची कल्पना समोर आली. नवीन धोरणानुसार अध्यापन शास्त्रातील झालेल्या बदलांकडे बारकाईने बघावे लागेल. बदल समजून घेऊन धोरणाच्या क्रियान्वयनाला गती द्यावी असेही ते म्हणाले. वर्गात उपस्थित सर्व शिक्षक कार्यकर्त्यांना या अभ्यास वर्गासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सत्राचे संचालन विदर्भ प्रांत सहमंत्री श्री.रोशनजी आगरकर यांनी केले. सत्राचा आरंभ शुभांगी नाफड यांनी गायिलेल्या सरस्वती वंदनेनी करण्यात आला. या निवासी प्रशिक्षण वर्गाला संपूर्ण राज्यभरातून ५० कार्येकर्ते सहभागी झाले आहेत.

हिन्दी अनुवाद

एक अच्छा शिक्षक बनने के लिए विद्यार्थी वृत्ति को जगाना आवश्यक है – श्रीधर गाडगे

विद्या भारती ने राष्ट्रीय शिक्षा नीति पर राज्य स्तरीय संवर्ग प्रशिक्षण वर्ग का शुभारंभ किया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के नागपुर महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे ने जोर देकर कहा कि एक अच्छा शिक्षक बनने के लिए छात्र की प्रवृत्ति को जगाना आवश्यक है। वे विद्या भारती द्वारा महाराष्ट्र राज्य स्तर पर “राष्ट्रीय शिक्षा नीति के अनुसार शिक्षाशास्त्र में परिवर्तन” पर आयोजित तीन दिवसीय कार्यकर्ता अध्ययन वर्ग के उद्घाटन भाषण के रूप में बोल रहे थे। भारत तो आजाद हो गया लेकिन 75 साल बाद भी मेकाले द्वारा थोपी गई शिक्षा व्यवस्था से हम आजाद नहीं हो सके। उसके लिए इस नई शिक्षा नीति की जरूरत थी। लेकिन इस नई नीति को लागू करना आवश्यक है ताकि केवल नीति ही नहीं बदली जाए बल्कि शिक्षकों के माध्यम से समाज की मानसिकता भी उसी के अनुरूप बदली जाए। इसके लिए शिक्षक को विद्वान होना चाहिए। इस अवसर पर, जैसा कि यह एक अवसर है, उन्होंने सभी से शिक्षा के माध्यम से भारतीय संस्कृति पर आधारित समाज के निर्माण के लिए मिलकर काम करने और ऐसी मानसिकता के साथ काम करने की अपील की। विदर्भ प्रांत की उपाध्यक्ष सुश्री. प्रांजलिताई जोशी और विद्या भारती विदर्भ एवं देवगिरी प्रांत के केंद्रीय मंत्री शैलेश जोशी शामिल हैं।

अध्ययन वर्ग की भूमिका बताते हुए शैलेश जोशी ने कहा कि राष्ट्रीय शिक्षा नीति के क्रियान्वयन को लेकर राष्ट्रीय स्तर के प्रशिक्षण वर्ग के अनुभव से इस वर्ग का विचार आया। नई नीति के अनुसार, शिक्षणशास्त्र में परिवर्तनों को बारीकी से देखना होगा। उन्होंने यह भी कहा कि बदलावों को समझकर नीति के क्रियान्वयन में तेजी लाई जानी चाहिए। उन्होंने कक्षा में उपस्थित सभी शिक्षकों को इस अध्ययन कक्षा के लिए शुभकामनाएं दी। उद्घाटन सत्र का संचालन विदर्भ प्रांत के संयुक्त मंत्री श्री रोशनजी आगरकर ने किया। सत्र की शुरुआत शुभांगी नफड द्वारा गाए गए सरस्वती वंदना से हुई। इस आवासीय प्रशिक्षण वर्ग में प्रदेश भर से 50 श्रमिकों ने भाग लिया है।

Previous articleSERF Organises 2-day National Seminar
Next articleविद्या भारती कार्यालय का भव्य उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here